Posts

Showing posts from July, 2018
Image
सोरायसिस ऑफ बाय आयुर्वेद  सोरायसिस म्हटले की  माझ्यासमोर बसलेला पेशंट, प्रचंड तणावाखाली असलेला चेहरा, चेहऱ्यावर भिती, नर्व्हसनेस आणि आता हा माझा आयुष्याचा सोबती आहे ही  भावना खरतर सोरायसिसचा  खुपच बाऊ करून ठेवलाय असं म्हणायला हरकत नाही. बर पेशंट नुस्ती काळजीच करणार,अरे  बाबा पोट  कुठे चाललय , फॅटी लिव्हर आहे, व्यसन सोडावं लागेल म्हटल्यावर व्यायाम आणि मी , नाही जमणार खूप बिझी असतो,ऑफिसर आहे, मी आणि व्यायाम मला तर मुलांचा डब्बा नवऱ्याचा डब्बा , सकाळी जमणारच नाही अशी अनेक कारणे कानावर आदळतात असो. सोरायसिस बरा झालेला एक पेशंटची  पूर्ण केस हिस्टरी अशी आहे त्याचे नाव राजेश असुन वय ३५ ते ३७ असावे,  मार्च २०१७ मध्ये उपचार सुरु केले पण दोन महिन्यानंतर परत आला. दोन महिन्यात थोडा रिकव्हर झाला होता परत  तसाच होऊन आला. आयुर्वेद औषधी सोबत पथ्य आणि नियमित औषधी घ्यावी लागतात महत्व परत एकदा समजावून झाले त्याने पुर्ण अंगभर सोरायसिस आणि रोज १ बकेटभर flacky  skin म्हणजे कोंड्यासारखी त्वचा निघते त्यामुळे नोकरी सोडून दिलेली होती. गावाकडे औरंगाबाद सोडून रहायला गेला होता त्यामुळे परत त्यालाच महत्व क
Image
प्रश्न - कोडाचे रुग्ण कश्याप्रकारे आयुर्वेद उपचाराने बरे होतात, त्यापैकी त्रासदायक प्रकार कोणता?  उत्तर - कोडाच्या रुग्णांपैकी रुग्णाचा इतिहास घेतला जातो. त्यानुसार कोड किती लवकर बरा  होऊ शकतो ,ह्यासाठी -   १. रुग्णाचे वय- ४ते ५ वर्षाच्या मुलांपासुन ६० वर्षापर्यंत कुठलाही रुग्ण आमच्या कडे येतो. त्यापैकी लहान मुले व  तरुण लवकर उपचाराला प्रतिसाद देतात. २. आजाराचा कालावधी- कोड किती जुनाट आहे ह्यावर तो बरा होण्याचा कालावधी अवलंबुन असतो. खुप जुनाट आजार बरा  करायला वेळ  लागतो. ३. अनुवंशिकता - काही रुग्णाच्या फॅमिलीमध्ये हा आजार असतो. आजी, आजोबापैकी, आत्या, मामापैकी कुणाला असतो. तेव्हा  ह्या रुग्णांना खुपच वेळ लागतो किंवा एक डाग बरा झाला की  दुसरा तयार होतो. ४. रुग्णाची प्राकृत अवस्था किंवा इतर आजार - रुग्णाची शारीरिक क्षमता त्याला आपण फिटनेस म्हणु शकतो. तो उत्तम असल्यास रुग्णाचा त्वचारोग लवकर बरा  होऊ शकतो. ह्याशिवाय रुग्णास इतर आजार असतील उदा. डायबिटीस, थायरॉईड, काही स्त्रियांना गायनिक डिसीज, सोरायसिस  व  कोड दोन्ही त्वचारोग एकत्र असणे ह्याप्रकारे रुग्णाला  ठीक व्हायला
Image
  प्रश्न  कोड ह्या आजारात आहार कसा घेतला पाहिजे ?   उत्तर - कोड ह्या आजारात आंबट पदार्थ, दुधाचे पदार्थ पूर्णतः वर्ज्य केले पाहिजे. विरुद्धान्न अजिबात घ्यायला  नको. विरुद्धान्नमध्ये  ,दूध+ आंबट फळे, दूध+केळी, दूध+उडीद डाळ, दूध+मीठ, विरुद्ध रस एकत्र घेऊ नये. त्यामुळे कोड जास्त वाढू  शकतो . शिवाय मांसाहारी रुग्णांनी मासे, अंडी, मांस पुर्णतः वर्ज्य करावे. क्लेद उत्पन्न करणारे पदार्थ वर्ज्य करावे. आहाराशी बऱ्याच गोष्टी निगडीत असतात. त्यामुळे आयुर्वेदात आहाराला खुप महत्व दिल्या गेलेले  आहेत. शरीराचे पोषण संपुर्णतः आहारातुनच होत असते . आहार उत्तम असल्यास आजार दुर पळतात. हॉटेलचे पदार्थ बनविताना त्यात कृत्रिम रंग, अप्राकृतिक पदार्थ असल्यास त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. तेव्हा ताजे व सकस पदार्थ मिळतील तिथेच हॉटेलिंग करावे. मिल्कशेक्स, आईस्क्रिम जेवणानंतर शक्यतो घेऊ नये. रात्री हलका आहार घ्यावा . रात्रीचे जेवण संध्या ७ते ८ च्या दरम्यान घ्यावे. रात्री लवकर झोपुन सकाळी लवकर उठावे. योगासने, चालणे, पोहणे, पाळणे, ह्यापैकी जो शक्य आहे तो व्यामाचा प्रकार करावा. क्रमशः 
Image
प्रश्न - कोडावर आयुर्वेदातील उपचारपद्धती कशा प्रकारे काम  करेल? उत्तर - आयुर्वेदात सर्व त्वचारोगाचा अंतर्भाव हा  पित्त दोष व रक्त धातु ह्यामध्ये होतो. पित्ताची सान्यावस्था बिघडली  की  तो रक्तधातूमध्ये दोष निर्माण करतो. रक्तातील उष्णता, अशुद्धता वाढली की  अगदी पिंपल्सपासून सोरायसिस पर्यंतचे कुठलेही त्वचारोग शरीरात निर्माण होऊ शकतात. त्याची सम्प्राप्ती  होऊ शकते. आता पित्ताचा खूप जवळचा संबंध  आहाराशी आहे. तुम्ही कुठला आहार घेता, कधी घेता? ह्याला  खूप महत्व आहे. सकाळी भरपूर तुपाची पुरणपोळी खाल्ली तर त्याचे पचन व्यवस्थित होते. पण तीच जर तुम्ही रात्री उशिराच्या जेवणात खाल्ली तर त्याचे पचन व्यवस्थित होणार नाही. अशा पद्धतीने सदोष आहाराचे सेवन केल्यास पित्त दूषित होऊन त्वचारोगाची सुरुवात होते. आपण त्याला ऍलर्जी म्हणतो. आहारातील काही विशिष्ट पदार्थाची  ऍलर्जी ही जर पित्त दूषित नसेल तर होतच नाही. आयुर्वेद शास्त्र तुमच्या आजाराच्या उत्पत्तीपर्यंत जाते. आजाराचे मूळ कळाल्यावर उपचार परिपूर्ण होतात. कोड ह्या त्वचारोगात पित्ताच्या दोषामुळे भ्राजक पित्त जे त्वचेला रंग देणाऱ्या पेशी आहेत मेलॅनिन त्या
Image
कोड - एक आयुर्वेद उपचार पद्धती  आयुर्वेदमध्ये त्वचारोगवार यशस्वीरीत्या उपचार होतात. मग  तो सोरायसिस  असो की कोडासारखा आजार असो दीर्घकाल उपचाराने त्यावर इलाज होतो. कोडासारख्या आजाराला समाज  विचित्र नजरेने बघत असल्यामुळे कोड झाला असे वाटल्यास  लगेच रुग्णांची झोप उड़ते. रुग्णाचे टेंशन वाढते. त्याबद्द्ल सतत विचार करणे , मानसिक ताण  घेणे हयातच रुग्ण गुरफटत जातो ह्यावर यशस्वी आयुर्वेद उपचार करणाऱ्या प्रसिद्ध सौंदर्यतज्ञ व त्वचारोगतज्ञ  डॉ. सौ. नेहा डोणगावकर रुग्णांच्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत .  प्रश्न - ह्या आजारावर रुग्णाच्या मनात साशंकता का असते ? उत्तर - रुग्णाला असे वाटणे अगदी साहजिकच आहे. कारण रुग्णाने भरपूर ठिकाणी उपचार घेतलेले असतात. त्यामध्ये त्याला म्हणावा तितकासा फरक पडलेला नसल्याने त्याची विचार करण्याची नकारात्मक प्रवृती झालेली असते. ह्यासाठी नियोजनबद्ध उपचार पद्धती, उत्तम मार्गदर्शन, आहारपद्धती ह्या सर्व महत्वाच्या गोष्टी असतात. ह्या पद्धतीची उपचार पद्धती खूप कमी ठिकाणी दिल्या जाते. शिवाय रुग्णाचा  सर्वात वीकपॉइंट म्हणजे सातत्य. ह्यामध्ये रुग्ण कमी पडतो. मला कोडमुक्त